खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

न्यायालयीन लढाईत तब्बल 11 वर्षांनी न्याय मिळाल्याने ‘सत्य परेशान होता है, पराजित नही’चा आला प्रत्यय !

न्यायालयाच्या आदेशाने आरोग्य निरीक्षक हैबतराव पाटील पालिकेच्या सेवेत पुन्हा रुजू

अमळनेर (प्रतिनिधी) सत्य परदेशान होता है, पराजित नही, या म्हणीचा प्रत्यय सुमारे 11 वर्षांपूर्वी एका गुन्ह्यात सेवेतून निलंबित झालेले अमळनेर पालिकेचे स्वच्छता विभागाचे आरोग्य निरीक्षक हैबतराव पाटील हे न्यायालयीन लढाईत निर्दोष सुटले आहेत यातून आला आहे. तर ते न्यायालयाच्याच आदेशानुसार पूर्ववत आरोग्य निरीक्षक या पदावर सेवेत रुजू झाले आहेत. तसेच मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सन्मानाने त्यांना नियुक्तीपत्र देत सेवेत रुजू करून घेतले आहे.
हैबतराव पाटील हे अमळनेर नगरपरिषदेच्या आस्थापनेवर स्वच्छता निरीक्षक पदावर कार्यरत असताना एका गुन्ह्यात कसुरी म्हणून दि 23 जून 2011 रोजी त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांनंतर सुमारे 11 वर्ष हैबतराव पाटील यांचा न्यायालयीन लढा सुरू होता. अखेर उच्चन्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे कडील पारित निकालानुसार हैबतराव पाटील हे गुन्ह्यातून निर्दोष होऊन त्यांना पुन्हा मूळ आरोग्य निरीक्षक या पदावर पदस्थापना देण्याचे आदेश झाल्याने अमळनेर मुख्याधिकारी यांनी दि 27 जून 2022 पासून त्यांना रुजू करून घेतले आहे. त्यांनी आपले कामकाज देखील सुरू केले आहे.सदर नियुक्ती प्रसंगी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, आरोग्य निरीक्षक वाय. एस. चव्हाण, महेश जोशी उपस्थित होते.मोठ्या प्रतीक्षेनंतर न्याय मिळाल्याने पाटील यांचे सर्वत्र स्वागत होत आहे. विशेष म्हणजे कामाच्या बाबतीत कर्तव्यदक्ष म्हणून त्यांची ख्याती राहिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button