खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अवैध वाहतूक थांबवण्यासाठी महिला बसली दुसऱ्यांदा उपोषणाला

अमळनेर (प्रतिनिधी ) नाल्यातील गौणखनिजाची अवैध वाहतूक थांबवण्यासाठी तालुक्यातील एकलहरे येथील महिलेने दुसऱ्यांदा तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषणास सुरुवात केली आहे. 
तालुक्यातील एकलहरे येथील लौकी नाल्यातून बेकायदेशीर मुरूम, गाळ, आणि रेती काढणाऱ्यावर कारवाई करावी यासाठी एकलहरे येथील भारती भरत कोळी यांनी दुसऱ्यांदा तहसिल आवारात उपोषण सुरू केले आहे. या नाल्यातून बेकायदेशीर रित्या वाळू मुरूम काढून नेल्याने नाल्यात साचलेल्या पाण्यात भारती कोळी यांचा मुलगा निलेश भरत कोळी याचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर या बेकायदेशीर रित्या उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी यांसाठी २७ सप्टेंबर रोजी तहसिल आवारात उपोषण केले होते. तरीही कारवाई न झाल्याने त्यांनी पुन्हा उपोषणास सुरुवात केली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button