भारतीय किसान संघाने जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादनाच्या भावावर आधारित हमी भाव द्या या मागणीसाठी भारतीय किसान संघाने बुधवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निदर्शने केली.
केंद्र सरकार वेळोवेळी पिकांसाठी न्यूनतम समर्थन मूल्य घोषित करते. परंतु त्याचा लाभ शेतकऱ्यांना न मिळता व्यापारी, विविध पक्ष नेते यांनाच तो लाभ मिळतो. म्हणून शेतकरी कर्जबाजारी व गरीब होत असल्याचे चित्र आहे, न्यूनतम समर्थन मूल्य हे भ्रमाचा भोपळा वाटतो म्हणून उत्पादन खर्चावर आधारित लाभ दायी मूल्य /दर मिळणे साठी धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रा. मनोहर बडगुजर, कपिला मुठे, डॅा. दीपक पाटील, वैभव महाजन, रवींद्र पाटील, प्रभाकर पाटील, रतिलाल कोळी, सतीश पाटील, श्रीकांत नेवे, भगवान न्हायदे, अमोल पाटील, प्रेमचंद भारंबे, अनुप पाटील, प्रतिक पाटील, मयूर पाटील, स्वप्नील पाटील, प्रमोद महाजन, श्रीकांत श्रीखंडे रावेर, शिवराम महाले, जामनेर, अॅड. दीपक शिंदे जळगाव उपस्थित होते.