खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

बोरी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला, पाणीटंचाई झाली दूर

धरणाचे १५ दरवाजे उघडले, नदी काठावरील नागरिकांना इशारा

अमळनेर (प्रतिनिधी)  पारोळा तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला असून धरणातून बोरी नदीत पाण्याचा विसर्ग होत आहे. तर रात्री ९.१५ वाजता धरणाचे १५ दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले आहेत. यामुळे १३५४३ क्युसेस पाणी बाहेर पडत आहे. यामुळे नदी काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. तर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणीटंचाई दूर होईन सिंचनासही मोठा फायदा होणार आहे.
पारोळा तालुक्यातील बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे धरणात १०० टक्के पाणीसाठा झालेला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने धरणाचे सुरक्षितेच्या दृष्टीने पुराचे पाणी नदी पात्रातील विसर्ग जास्त  वाढण्याची शक्यता आहे.  बोरी धरणाचे खालील बोरी नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिल आहे. बोरी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button