खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

नापास झालेले विद्यार्थी अखेर १२ रोजी महाविद्यालयासमोर करणार आत्मदहन

अमळनेर (प्रतिनिधी ) अंदोलन करूनही नापास केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावलेला नाही. त्यामुळे येत्या ४८ तासाच प्रश्न निकाली न लागल्यास १२ ऑगस्ट रोजी विद्यार्थी महाविद्यालयासमोर आत्मदहन करतील, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
प्राचार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीएस्सीच्या अंतिम वर्षाचा निकाल लागला आहे. लेखी परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत. परंतु काही विद्यार्थ्यांना नापास व गैरहजार दाखवण्यात आले आहे. हे महाविद्यालयाने हेतू पुरस्कृत केले आहे याची खंत वाटते. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आंदोलही केले होते. निकाल लागून आज १५ दिवस उलटले तरी विद्यार्थ्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे येत्या ४८ तासात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय न मिळाल्यास विद्यार्थी १२ ऑगस्ट रोजी महाविद्यालयासमोर आत्मदहन करतील. याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यायाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस ठाणे, कुलगुरू यांना देण्यात आल्या असून निवेदनावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सचिव भूषण भदाणे, श्रीनाथ पाटील, सुनील शिंपी, अनिरुद्ध शिसोदे यांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button