खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

जळोद येथे देखील ग्रामस्थांनी जिवंत माणसाची काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा

अमळनेर(प्रतिनिधी)शेतातील उभी पिके जळू लागल्याने पावसाला विनवण्यासाठी गांधली पाठोपाठ जळोद येथे देखील ग्रामस्थांनी जिवंत माणसाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून वरुणराजाला साकडे घातले.
जळोद येथे प्रतिमत्मक प्रेत म्हणून रमा पिंजारी व आग्या म्हणून मोतीलाल चौधरी होते. यावेळी गावातील सरपंच भारती साळुंखे, शशिकांत साळुंखे, हरेश कोळी, ज्ञानेश्वर चौधरी, पोलिस पाटील अशोक शिरसाठ, जवरलाल भोई, कमलाकर चौधरी, काशीनाथ कोळी, हिंमत भोई, विलास देशमुख, बापुराव कोळी, अनिल साळुंखे, रघुनाथ धनगर, मुकूंद चौधरी, मुन्ना चौधरी, संजय चौधरी, छगन चौधरी,संदीप देशमुख,नाना धोबी उपस्थित होते. असंख्य ग्रामस्थांनी यावेळी उपस्थिती देत प्रेताजवळ बसून टाहो देखील फोडला. आमच्या या भावनेला साद देत नक्कीच वरुणराजा बरसून बळीराजाला तारेल असा विश्वास सरपंच भारती साळुंखे यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button