खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थितीवर उपाय योजना राबवाव्यात

माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केली मागणी

अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या दुष्काळ सदृश्य स्थितीवर उपाय योजनांसाठी शासन स्तरावरुन संबधित विभाग प्रमुखांना योग्य त्या कार्यवाहीच्या सूचना देण्याची मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केली आहे.
माजी आमदार साहेबराव पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर तालुक्यात जानेवारी ते डिसेंबर अखेर वार्षिक पर्जन्यमान ६७०.७१ मी. मीटर असून जून ते सप्टेंबर या खरीप हंगामातील जून – ११४.८३, जुलै- १८५.६१, ऑगस्ट – १७३.९२ आणि सप्टेंबर-११४.६४ असे एकूण ५८९.०० मी.मी. पर्जन्यमान अपेक्षित असून चालू खरीप हंगातील जून ११४.८३ आणि जुलै- १८५.६१ असे एकूण ३००.४४ मी.मी. अपेक्षित पर्जन्यमानापैकी १० जून – ११४.८३ मी. मी. पैकी ४१.५० मी.मी. आणि १२ जुलै अखेर १८५.६१ मी.मी. पैकी फक्त ९.५३ मी.मी. म्हणजेच आज अपेक्षीत कालावधीत अमळनेर तालुक्यात सरासरी पर्जन्यमान फक्त ५१.३ मी.मी. एवढे एकूण सरासरीच्या एकूण ५० टक्क्यापेक्षा अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पीक परिस्थितीनुसार विपरीत परिणाम होवून पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचे खते, बियाणांचे विपरित नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. या दुष्काळ सदृश्य स्थितीवर उपाय योजनांसाठी शासन स्तरावरुन संबधित विभाग प्रमुखांना योग्य त्या कार्यवाहीच्या सूचना देण्याची मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button