खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

निम्न तापी प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे काम लवकरच होणार

अमळनेर येथील सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आश्वासन

अमळनेर (प्रतिनिधी)निम्न तापी प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे काम लवकरच होईल. शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्नांना काही दिवसात न्याय देण्याचा प्रयत्न राहील, असे आश्‍वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
अमळनेर येथील अंबिका मंगल कार्यालयात झालेल्या सभेत मार्गदर्शन करताना सांगितले. बुधवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित सभा रात्री साडे अकराच्या सुमारास सुरू झाली आणि गुरुवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास आटोपली. व्यासपीठावर काँग्रेसचे कार्यध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री शोभा बच्छाव , अतुल लोंढे माजी खासदार उल्हास पाटील , आमदार प्रणिती शिंदे , आमदार शिरीष चौधरी , जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील , महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ ,डी जी पाटील तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे , माजी आमदार साहेबराव पाटील ,प्रदीप पवार , डॉ अनिल शिंदे ,सचिन सोमवंशी उपस्थित होते.

इंग्रजांच्या काळातील लढाई आता पुन्हा सुरू करण्याची वेळ

भाजप पेट्रोल डिझेलचे भाव वाढवून अप्रत्यक्ष देशातील जनतेला गरीब करण्याचे काम करीत आहे. इंग्रजांच्या काळातील लढाई आता पुन्हा सुरू करण्याची वेळ आली आहे. काँग्रेस देशासाठी आणि संविधांसाठी कटिबद्ध राहील असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

अमळनेर तालुक्यासाठी ५ ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचे केले लोकार्पण

यावेळी अमळनेर तालुक्यासाठी ५ ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचे लोकार्पण करण्यात आले. प्रास्तविक मनोज पाटील यांनी केले. सभेस जिल्हा किसान सेलचे अध्यक्ष सुरेश पिरन पाटील , तालुकाध्यक्ष सुभाष पाटील , मुन्ना शर्मा , अलीम मुजावर,सह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button