स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

???????? इतिहासातील काही महत्त्वपूर्ण तथ्य. ????????

#Instiute #Newspapers #SamajSudharaak

●निष्काम कर्ममठ (1910) महर्षी धो.के.कर्वे

●निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे यांना संबोधतात.

●हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले यांना संबोधतात.

●महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील यांना संबोधतात.

●हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय यांना संबोधतात.

●महाराष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले यांना संबोधतात.

●अहिल्याश्रम (1923) वि.रा.शिंदे

●पवनार आश्रम ,वर्धा (1921) विनोबा भावे

●अनाथ बालिका आश्रम (1899) महर्षि धो.के.कर्वे

●विक्टोरीया अनाथाश्रम (1869) महात्मा फुले

●विक्टोरीया मराठा बोर्डींग (1901) शाहू महाराज

●सेवा समिती (1910) हृदयनाथ कुंझर

●पूना सेवा सदन (1884) रमाबाई रानडे

●शारदा सदन मुंबई (1889 ) पंडिता रमाबाई

●मुक्ती सदन केडगाव (1898) पंडिता रमाबाई

●कृपा सदन, प्रीती सदन —पंडिता रमाबाई

●केसरी — लोकमान्य टिळक

●महाराष्ट्र केसरी — पंजाबराव देशमुख

●महाराष्ट्र धर्म —विनोबा भावे

●अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) पंजाबराव देशमुख

●पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) साने गुरुजी

●नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) बाबासाहेब आंबेडकर

●पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —(नेतृत्व) एस.एम.जोशी

●कुसाबाई शी पुनर्विवाह 1874 रोजी विष्णू शास्त्री पंडित यांनी केला.

●गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) महर्षी धो.के.कर्वे यांनी केला.

●स्वत:च्या मुलीचा पुनर्विवाह रा.गो.भांडारकर यांनी केला.

●विधवा विवाह उत्तेजक मंडळी (1893)महर्षी धो.के.कर्वे

●पुनर्विवाह उत्तेजक मंडळी (1865) न्या.म.गो.रानडे

●विधवा विवाह पुस्तक — विष्णू शास्त्री पंडित

●विधवा विवाहाचा कायदा व पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता (1917) शाहू महाराज यांनी दिली.

●आंतर जातीय विवाहास मान्यता देणारा कायदा (1918) शाहू महाराज यांनी केला.

???? ‘पृथ्वीचे अंतरंग’ या भूगोलाच्या घटकावर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-१ मध्ये किमान २ प्रश्न विचारले जातात. पृथ्वीच्या आंतरांगावरच पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना अवलंबून असते. म्हणून पृथ्वीच्या आंतरांगाचा अभ्यास महत्वाचा ठरतो.

???? पृथ्वीच्या अंतरंगाचे गूढ अजूनही मानवास उलगडलेले नाही. पृथ्वीच्या आंतरांगाच्या अभ्यासात प्रमुख दोन अडचणी आहेत.

???? पृष्ठभागावरील खडक हा कठीण व अपारदर्शक आहे. पृथ्वीच्या अंतर्गत भागात तापमान वृद्धी होत जाते. साधारणपणे ३० मी खोलीवर 1°C तापमान वाढत जाते.

???? अंतरंगाची माहिती मिळवण्यासाठी भूकंपशास्त्राची मदत होते.

???? भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास “सेस्मोग्राफ” अथवा “सेस्मॉमीटर” असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी “रिश्टर स्केल” ह्या एककाचा वापर केला जातो. जेव्हा भूकंप होतो तेव्हा सेस्मॉमीटरवर तीन प्रकारच्या लहरींची नोंद होते.

प्राथमिक लहरी (P Waves)
दुय्यम लहरी (S Waves)
पृष्ठीय लहरी (L Waves)
या लहरींच्या अभ्यासावरून पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती भूगर्भशास्त्रज्ञांना मिळते.

✅ प्राथमिक लहरींची वैशिष्ट्ये:

???? भूकंप यंत्रावर या लहरींची नोंद सर्वप्रथम होते, याचा आर्थ या लहरींचा वेग सर्वात जास्त असतो.

???? प्राथमिक लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल ही पुढे-मागे होते. प्राथमिक लहरी या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बऱ्याच खोलपर्यंत प्रवास करतात.

???? प्राथमिक लहरी या घन तसेच द्रव माध्यमातून प्रवास करतात. परंतु मध्यम बदलले की या लहरी वाक्रीभूत होतात.

✅ दुय्यम लहरींची वैशिष्ट्ये:

???? प्राथमिक लहारीनंतर या लहरींची नोंद होते. प्राथमिक लहरींपेक्षा वेग कमी.वस्तूकणांची हालचाल लहरींच्या काटकोनामध्ये होते. पृष्ठभागापासून २८८०km पर्यंतच प्रवास करतात.

???? दुय्यम लहरी फक्त घन माध्यमातूनच प्रवास करतात. माध्यम बदलले की या लहरी परावर्तीत होतात.

✅ पृष्ठीय लहरींची वैशिष्ट्ये:

???? पृथ्वीच्या कवचामध्येच या लहरी प्रवास करतात. या लहरींचा वेग कमी असतो. या लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल विविध दिशांनी होते. या लहरी अतिशय विध्वंसख असतात.

???? पृथ्वीच्या आंतरांगासंबंधी निष्कर्ष :-

???? पृथ्वीचा केंद्रभाग द्रवरूप:- पृथ्वीचे अंतरंग पूर्णतः घनरूप असते तर ‘P’ व ‘S’ लहरी गाभ्यातून आरपार गेल्या असत्या व भूकंप झालेल्या ठिकाणच्या विरुद्ध बाजूसदेखील भूकंपाची नोंद झाली असती. परंतु भूकंप लहरींच्या निरीक्षणावरून असे आढळते की, विरुद्ध बाजूस फक्त ‘P’ लहरींची नोंद होते. ‘S’ लहरी फक्त घन भागातून प्रवास करतात. यावरून केंद्रभाग द्रवरूप असावा असा निष्कर्ष काढता येतो.

???? भूगर्भातील गाभ्याचा व्यास ६९४२ km :- भूकंपाच्या उगमस्थानापासून १०३° चा कोण करून लहरी वळतात. १०३° ते १४२° प्रदेशात P व S लहरींची नोंद होत नाही; यामुळे या प्रदेशाला भूकंप छाया प्रदेश असे म्हणतात. यावरून भूगार्भाच्या गाभ्याचा व्यास ६९४२ km आहे असे निश्चित झाले.

???? बाह्यर्गाभा द्रवरूप:- गाभ्याच्या बाह्य अवरनाजवळ ‘P’ लहरींचा वेग एकदम कमी होतो. या गाभ्याचा बाह्य भाग द्रवरूप आहे असा निष्कर्ष काढता येतो.

???? कठीण घन पदार्थाचा आंतर्गाभा:- अंतर्गाभ्यात ‘P’ लहरींचा वेग वाढतो. यावरून असे अनुमान काढले जाते की, कठीण अशा घन पदार्थाचा आंतर्गाभा बनला असावा. कठीण घन पदार्थाचे प्रावरण:- ‘P’ व ‘S’ लहरींचा वेग प्रवारानातून प्रवास करताना इतका प्रचंड असतो की, अशा लहरी फक्त अति कठीण व घन पदार्थातूनच प्रवास करतात.

: एका ओळीत सारांश, 20 जानेवारी 2021

★◆★ संरक्षण ★◆★

20 जानेवारी ते 24 जानेवारी 2021 या काळात ‘एयर फोर्स स्टेशन जोधपूर’ येथे होणारी भारत आणि फ्रांस या देशांच्या हवाई दलांची हवाई कवायत – एक्स-डेझर्ट नाइट-21.

◆◆अर्थव्यवस्था◆◆

या स्टॉक एक्सचेंजने “StAR MF प्लस” नामक एक मंच तयार केला आहे, जो वितरकांसाठी संपूर्ण समाधान असणार, ग्राहकांना प्रवेश तसेच ई-केवायसीसाठी सक्षम करणार आणि ग्राहक पोर्टफोलिओ व्यवस्थापन उपलब्ध करून देणार – BSE (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज).

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

18 जानेवारी 2021 रोजी झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी मंडळाच्या 148 व्या सत्र बैठकीचे अध्यक्ष – डॉ हर्ष वर्धन (केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, भारत सरकार).

148 व्या WHO कार्यकारी मंडळ बैठकीत, वर्ष 2020 हे _ म्हणून पाळण्याची घोषणा केली गेली – ‘विज्ञान वर्ष’ (Year of Science).

148 व्या WHO कार्यकारी मंडळ बैठकीत, वर्ष 2021 हे _ म्हणून पाळण्याची घोषणा केली गेली – ‘जागतिक ऐक्यभाव व उत्तरजीवित्व वर्ष’ (Year of Global Solidarity and Survival).

25 जानेवारी ते 29 जानेवारी या काळात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) ‘दावोस एजेंडा’ कार्यक्रमाची संकल्पना – “ए क्रूशियल इयर टू रीबिल्ड ट्रस्ट”.

18 जानेवारी रोजी, भारत आणि ____  या देशांच्या सरकारांनी 14 उद्योग क्षेत्रांमध्ये कुशल भारतीय कामगारांच्या चळवळीला चालना देण्यासाठी सहकार करारावर स्वाक्षरी केली – जपान.

◆◆राष्ट्रीय◆◆

भारत सरकारने दरवर्षी 23 जानेवारी या दिवशी ____ यांची जयंती “पराक्रम दिवस” म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला – नेताजी सुभाषचंद्र बोस.

____ आणि इंडियन फार्म फॉरेस्ट्री डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFDC) या संस्थांनी आदिवासी उपजीविका निर्मितीसाठी एकत्र काम करण्याच्या हेतूने सामंजस्य करार केला – भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED).

◆◆व्यक्ती विशेष◆◆

‘प्रेस क्लब ऑफ बेंगळुरू’ यांच्यातर्फे देण्यात आलेल्या ‘प्रेस क्लब पर्सन ऑफ द इयर’ पुरस्काराचा विजेता – अझिम प्रेमजी (विप्रो लिमिटेड कंपनीचे ​​अध्यक्ष).

◆◆राज्य विशेष◆◆

महाराष्ट्रातले 9 वे ‘खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स’ (KISCE) – शिव छत्रपती क्रिडा संकुल, पुणे.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

“आंतरराज्य नद्या किंवा नदी खोऱ्यांच्या पाणी वाटपाच्या संबंधित तंट्याबाबत अभिनिर्णय” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 262.

“पाणी वाटपाच्या संबंधित तंट्याबाबत आंतरराज्य परिषद” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 263.

“वित्त याचे अर्थग्रहण” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 264.

“विधीच्या प्राधिकाराशिवाय कोणांकडूनही कर आकारला किंवा वसूल केला जाणार नाही” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 265.

“भारत आणि राज्यांचे एकत्रीकृत निधी आणि सार्वजनिक खाते” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 266.

“आकस्मिकता निधी” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 267.

 

: ????????आदर्शगाव संकल्प व प्रकल्प????????

✍“लोकसहभागातून ग्रामविकास व लोक कार्यक्रमांत शासनाचा सहभाग” या संकल्पनेवर आधारित असलेली आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना कार्यक्रम हा एक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्शवत उपक्रम आहे.
ही योजना ऑगस्ट क्रांती दिनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सन 1992 पासून कृषि विभागामार्फत सुरु करण्यात आलेली आहे.

????योजनेचा उद्देश????????

✍गाभा व बिगरगाभा क्षेत्राचा विकास आणि चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नसबंदी, नशाबंदी, निर्मलग्राम, (लोटाबंदी) बोअरवेल बंदी व श्रमदान या सप्तसुत्रीचे पालन गावाने व ग्रामसभेने निवडलेल्या स्वंयसेवी संस्थेच्या माध्यमातून करणे हा योजनेचा उददेश आहे.

????गाव निवडीचे निकष????????

✍गावाच्या एकूण क्षेत्रापैकी सर्व प्रकारे मिळून 30 टक्कयांहून अधिक सिंचन क्षेत्र नसावे. गावाची लोकसंख्या 4,000 च्या आत असावी. गावाचे महसुली क्षेत्र 1,500 हेक्टरपर्यंत असावे. गट ग्रामपंचायतीअंतर्गत स्वतंत्र वाडी/ वस्तीस सहभागी होता येते. ग्रामविकास निधी उभारुन तो चालविण्यासाठी ग्रामस्थांची तयारी असणे आवश्यक आहे. सप्तसुत्रीचे पालन करण्याची ग्रामस्थांची तयारी हवी. विविध ग्राम अभियानांत ( उदा.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम, तंटामुक्ती आदी.) पुरस्कार प्राप्त गावे.

????संस्था निवडीचे निकष????????

✍गावातील संस्थेला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. गावात संस्था नसेल, तर त्या तालुक्यातील 25 किलोमीटरच्या आतील गावातील जवळच्या संस्थेला प्राधान्य देण्यात यावे. ही संस्था शक्यतो जिल्हयातील असावी. या संस्थेची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे केलेली असावी. संस्थेची वार्षिक उलाढाल रु. 3 लाखांपेक्षा कमी असू नये. संस्थेचा तीन वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल सादर करणे आवश्यक. संस्था फॅमिली ट्रस्ट नसावी. तसेच घटना सादर करणे आवश्यक.

????लाभार्थी निवड प्रक्रिया????????

✍योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय तसेच जिल्हा, तालुका व ग्रामस्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष मा.मंत्री, जलसंधारण असून सदस्य सचिव संचालक (मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन ) हे आहेत. राज्यस्तरीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा कार्यध्यक्ष श्री. पोपटराव पवार असून, सदस्य सचिव संचालक मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन हे आहेत. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी असून, सदस्य सचिव म्हणून जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हे आहेत. तालुका स्तरीय समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी असून, सदस्य सचिव तालुका कृषि अधिकारी आहेत. ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष ग्रामसभेने निवडलेली व्यक्ती असते व त्याचे सदस्य सचिव कृषि सहायक आहेत.

✍वर नमूद केलेल्या संस्थेच्या तपशिलासह ग्रामसभेने शिफारस केलेल्या गावांची निकषांनुसार छाननी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे अध्यक्ष असलेल्या जिल्हा समितीमार्फत करण्यात येईल. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. जिल्हा समिती छाननीनंतर सहभागी होणाऱ्या प्रत्येक गावाचा वस्तुनिष्ठ अहवाल शिफारशीसह राज्यस्तरीय कार्यकारी समितीला सादर करेल.

✍ही समिती संबंधीत गावांची प्रत्यक्ष तपासणी करुन गावे व प्रकल्प कार्यान्वयीन संस्थेची प्राथमिक निवड करेल. योजनेमध्ये गावाची प्राथमिक निवड झाल्यावर पहिले सहा महिने पूर्वतयारी कालावधी राहील. या कालावधीत गावाने काही कामे पूर्ण करायची आहेत. 
मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे काम गाभा क्षेत्र विकासाचे काम म्हणून संबोधण्यात येते. यात मृद संधारण, सामाजिक वनीकरण,वन खाते, भूजल सर्वेक्षण व लघुपाटबंधारे या विभागांच्या कामांचा समावेश आहे.

????अर्थसाहाय्य व समाविष्ट जिल्हे????????

निवड होणाऱ्या गावांसाठी पाणलोट विकास कामे, सामूहिक संघटन, प्रशिक्षण, प्रशासकीय खर्च इ. अनुज्ञेय बाबींसाठी केंद्र शासनाच्या समाईक मार्गदर्शक सूचना 2008 नुसार हेक्टरी रु. 12 हजार प्रमाणे निधी मंजूर करण्यात येईल.

: ????✍️

*❇️सभी परीक्षाओं के लिए महत्वपूर्ण प्रश्नोत्तर❇️*

प्रश्‍न 1 –’नेत्रदान’ में रोगी में आँख के किस भाग का प्रतिरोपण किया जाता है?
उत्‍तर – कॉर्निया का

प्रश्‍न 2 – किस बकरी को ‘विश्‍व की दूध की रानी के नाम से भी जाना जाता है?
उत्‍तर – सानेन

प्रश्‍न 3– रासायनिक दृष्टि से चीनी क्‍या है?
उत्‍तर – कार्बोहाइड्रेट (सुक्रोज)

 

प्रश्‍न 4– किस खनिज को ‘बेवकूफों का सोना’ कहते हैं?
उत्‍तर – पायराइट को

प्रश्‍न 5 – रेड लैड का रासायनिक सूत्र है?
उत्‍तर–Pb3O4

प्रश्‍न 6– पीडियाट्रिक्‍स का सम्‍बन्‍ध किससे है?
उत्‍तर – बच्‍चों के रोगों से

प्रश्‍न 7– हाइपोग्‍लाइसेमिया नामक रोग रक्‍त में किसकी कमी से होता है?
उत्‍तर – ग्‍लूकोस की कमी से

प्रश्‍न 8 – विज्ञान की शाखा एग्रोस्‍टोलॉजी में किसका अध्‍ययन किया जाता है?
उत्‍तर – घास का

प्रश्‍न 9– मनुष्‍यमें गेस्ट्रिक रस (Gastric Juice) किस अंग से स्रावित होता है?
उत्‍तर– आमाशय से

प्रश्‍न 10 – डीटीपी का टीका बच्‍चों को किन रोगों से रक्षा के लिए लगाया जाता है?
उत्‍तर – टिटेनस, डिप्‍थीरिया तथा काली खाँसी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *