खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

आई शेतात आणि वडिल गावात गेल्यावर तरुणाने केली आत्महत्या

भिलाली येथील घटना,  मुलाचा लटकलेला मृतदेह पाहून वडिलांनी फोडला हंबरडा

प्रतिनिधी (प्रतिनिधी) आई शेतात आणि वडिल गावात गेल्याने घरात एकट्या असलेल्या तरुणाने  नैराश्येतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील भिलाली येथे १७ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अनिल शांताराम माळी (वय २४) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो या अविवाहित होता. तर त्याच्या तीन बहिणींचे लग्न झाले आहे. तो होतकरू होता. त्यामुळे तो शेतीसह मिळेल ते काम करत होता. आईवडिलांनी त्याच्या लग्नाच्या विचारांतून अपूर्ण असलेल्या घराची दुरुस्ती करून घेतली. गुरुवारी आई शेतात तर वडील गावातील भाऊबंदकित पितर व्हायला गेलेले पाहून एकुलता एक असलेल्या अनिलने घराच्या शेवटच्या खोलीतील बंगीच्या कडील सुतची दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार दुपारी १२:३० च्या दरम्यान वडिलांना निदर्शनास आला. मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्यांनी हंबरडा फोडल्याने शेजारच्या छबिलदास घोडे यांनी धाव घेतली.  त्यांनी पोलीस पाटील यांना माहिती दिली. घटनास्थळी हवालदार भास्कर चव्हाण , पोलीस नाईक सचिन निकम यांनी घटनास्थळी येऊन गोरख राजपूत ,कोमलसिंग राजपूत यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आल्यावर डॉ. जी .एम. पाटील यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवल्यावर भिलाली येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले . अनिलच्या पश्यात आई वडील ,तीन बहिणी असा परिवार आहे , याबाबत मारवड पोलीस ठाण्यात पोलीस पाटील दगा पाटील यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार भास्कर चव्हाण हे करीत आहेत,

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button