खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर मतदार संघातील प्रश्नांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरूच ठेवणार : आमदार अनिल पाटील

अमळनेर (प्रतिनिधी)कोरोनामुळे दोन दिवसाच्या अधिवेशनात अमळनेर मतदार संघातील प्रश्न मांडता आले नसले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून आपण सिंचन प्रकल्प आरोग्य या प्रश्नांना तडीस नेणार आहोत, अशी माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली.
राज्यात कोरोनाची गंभीर स्थिती असतांना त्या सावटाखाली अधिवेशन पार पडले.  मात्र अधिवेशनात प्रश्नोत्तरे न झाल्यामुळे अमळनेर मतदार संघातील महत्वाचे प्रश्न सोडवता आले नसले तरी आपण शासनदरबारी पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत. व या सर्व महत्वाच्या  प्रश्नांना तडीस नेण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button