अमळनेर (प्रतिनिधी)गंदगी मुक्त भारत अभियानामार्फत प्रताप महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककामार्फत दत्तक गाव रढावन राजोरे येथे वृक्षरोपण उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच सुंदरबाई यांच्यावतीने ढोमन चिंधु पाटील यांनी वृक्षरोपण केले. उपसरपंच जालंधर पाटील यांनी राम मंदिर परिसर स्वच्छ केला. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य गंगाराम पाटील, अमृत काळे, आंनदा पाटील यांनी स्वच्छतेचि शपथ घेऊन स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमास ज्येष्ठ ग्रामस्थ भिकन चिंधु पाटील,पांडुरंग पाटील, सुधाकर काळे,राजेंद्र पाटील, धनराज पाटील , शांताराम पाटिल, दौलत पाटील व ह.भ.प. बापू पाटील हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. अवित पाटील, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. योगेश पाटील ,महिला कार्यकर्म आधिकारी पुष्पा पाटील, ग्रामसेवक राहुल पाटील व रासेयो स्वयंसेवक निखिल पाटील ,आकाश धनगर, प्रेम धिवरे यांनी मेहनत घेतली.