…अन्यथा स्वातंत्र दिनी उपोषण करण्याचा नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचा इशारा
अमळनेर (प्रतिनिधी) वैशिष्ट्यपूर्ण योजनेचा निधी अमळनेर नगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा स्वातंत्र्य दिनी उपोषण करण्याचा इशारा नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पत्र दिले आहे.
नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी जिल्हाधिकारी राऊत यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन-नगरविकास विभाग,शासन निर्णय दिनांक १७ नोव्हेंबर,२०१७ मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन-नगरविकास विभाग शासन निर्णय दिनांक २० नोव्हेंबर, २०१७ अन्वये रुपये २ कोटी आणि ३ ऑक्टोबर,२०१८ अन्वये २ कोटीसाठी “वैशिष्ट्यपूर्ण” योजने अंतर्गत निधी वितरीत करण्यासंदर्भात याचिका टाकण्यात आलेली आहे. तथापी राजकीय हस्तक्षेपामुळे व प्रभावामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारात कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसतांनाही राज्य शासनाने कार्यान्वयन यंत्रणा नगरपरिषदे ऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग करण्यात येऊन संदर्भाहींन क्रमांक १ मधील सुधारित मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यास आला असूनही अनुज्ञेय नसलेली नगरपरिषद क्षेत्राबाहेरील कामांच्या यादीत समावेश असल्यामुळे औरंगाबाद खंडपीठात याचिका याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.त्यात दिनांक १५ मे, २०१९ च्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडे दिर्घकालीन प्रलंबित प्रस्तावावर त्वरीत निर्णय घ्यावा अन्यथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर स्वातंत्रदिनी उपोषण करणार आहे, असा इशारा दिला आहे.