खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

वडिलांनी अभ्यासाचे विचारल्याचा राग येऊन तांबेपुरा भागातील मुलगा घर सोडून निघून गेला

अमळनेर (प्रतिनिधी) वडिलांनी अभ्यासाचे विचारल्याने राग येऊन १८ वर्षाचा मुलगा घरातून निघून गेल्याची घटना शहरातील तांबेपुरा भागात घडली. याप्रकरणी पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील तांबेपुरा भागातून प्रशांत देवीसिंग इच्छे (वय १८ या) मुलाला त्याच्या वडिलांनी अभ्यास का करत नाही, असे विचरल्याचा राग आल्याने २३ रोजी सकाळी काही न सांगता घरातून निघून गेला आहे. त्याचे वडील नानासाहेब उर्फ देवीसिंग इच्छे यांनी दिलेल्या माहितीवरून  हरवलीसची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button