अमळनेरकरानो जनता कर्फ्यु स्वयंस्फूर्तीने पाळा : आमदार अनिल पाटील यांचे आवाहन
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेरात वाढत्या कोरोना संपर्काची चेन ब्रेक करण्यासाठी आणखी तीन दिवस जनता कर्फ्यु उद्या दि १२ ते १४ मे पर्यंत पळण्यात येणार आहे. जनतेने स्वयंस्फूर्तीने यावेळीही प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.
आमदार अनिल पाटील यांनी दि ७ मे पासून पाच दिवस जनता कर्फ्युचे आवाहन केल्यानंतर नागरिकांनी यास स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. यादरम्यान किराणा भाजीपाला व मेडिकल दुकाने देखील बंद राहिल्याने कोणीही रस्त्यावर दिसून आले नाही,यामुळे जनता कर्फ्यु १००टक्के यशस्ची झाला.या कर्फ्युची मुदत सोमवारी दिनांक ११ मे रोजी संपल्याने पुढे अत्यावश्यक सेवा पूर्ववत सुरू होणार का याबाबत नागरिकांत संभ्रम होता.यासंदर्भात आमदार अनिल पाटील यांनी प्राशसन आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी या कर्फ्युचा चेन ब्रेक करण्यात मोठा फायदा झाल्याचे सांगितले. मात्र याच पद्धतीने अजून तीन दिवस हा कर्फ्यु पाळला गेल्यास ही चेन पूर्णपणे ब्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केल्याने जनता कर्फ्यु दि १२ पासून पुढे अजून तीन दिवस कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात कुणीही पुढील तीन दिवस घराबाहेर न निघता घरातच रहा आणि सुरक्षित राहावे
यासंदर्भात आमदार पाटील म्हणाले की, पाच दिवस नागरिकांनी जो संयम ठेऊन प्रतिसाद दिला तो कौतुकास्पद आहे. तसाच प्रतिसाद अजून तीन दिवस दिल्यास निश्चितपणे ते आपल्या आणि शहराच्या हिताचे राहणार आहे,त्यासाठी अजून थोडा त्रास सहन करा. लवकरच आपल्या भूमीला पूर्वीप्रमाणेच सुगीचे आणि आनंदाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही.हा जनता कर्फ्यु आपल्यावर कुणीही लादत् नसून तो आपण आपल्यासाठीच स्वयंस्फूर्तीने पळणार आहोत.यादरम्यान अत्यावश्यक सेवा देखील बंदच ठेवाव्या लागतील. यासाठी संबंधित व्यावसायिकांनी देखील सहकार्य करावे.कुणीही पुढील तीन दिवस घराबाहेर न निघता घरातच सुरक्षित राहावे असे आवाहन केले आहे.