आमदार स्मिताताई वाघ यांच्या सुचनेनुसार प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत निर्णय
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली अमळनेर कृषि उपन्न बाजार समितीत दि.२२ पासून पुन्हा धान्य खरेदी सुरु करण्यात येणार असल्याचा निर्णय मंगळवारी आमदार स्मिताताई वाघ यांच्या सुचनेनुसार प्रांतधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे.
अमळनेर येथील कृषि उपन्न बाजार समितित तालुक्यासह जिल्हाभरातून मोठी आवक होत असते. बाजार समिति बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचणीत भर पडत होती. त्यामुळे बाजार समिति नियमित सुरु करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ह्या बैठकीला बाजार समिति सभापती प्रफुल्ल पवार,बाजार समिति संचालक हरी भिका वाणी,शंकर बितराई उपस्थित होते.
या नियमांचे करावे लागेल पालन
कृषि उपन्न बाजार समितित माल विक्रीला येताना वाहन चालक व शेतकरी ह्या दोघांना प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच दोन पेक्षा अधिक व्यक्ति असल्यास लिलाव करण्यात येणार नाही. शेतकऱ्यांनी बाजार समितित ‘सोशल डिस्टन्सींग ‘ राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन बाजार समिति सभापति प्रफुल्ल पवार व संचालक मंडळाने केले आहे.