नागरिकांना सकाळी व संध्याकाळी दररोज केले जाणार अन्नदानाचे कार्य
अमळनेर (प्रतिनिधी गौक्षेत्र प्रतिष्ठान व माजी आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब परिवारास अन्नदान वाटपास माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. नागरिकांना अन्नदान करताना कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली. रोज नागरिकांना सकाळी व संध्याकाळी अन्नदान केले जाणार असल्याने या सतकार्याचे कौतुक करीत आहे.प्रसंगी मंगळ ग्रह संस्थांचे अध्यक्ष डिगंबर महाले, गटनेते बबली पाठक, गौक्षेत्र प्रतिष्ठानचे चेतन शाह, महेंद्र पाटील, चेतन सोनार , बाळासाहेब संदानशिव, आरिफ भाया, पंकज चौधरी, अबू महाजन, संतोष लोहेरे , विजय चौधरी, पारस धाप, भूषण पाटील, विष्णू पाटील, ब्रिजलाल पाटील,राकेश चौधरी, भूषण अहिरराव, चेतन चौधरी, गौरव पाटील, जयेश चौधरी, हितेश देसले, रोहित मकवाना मित्र परिवार व राजे संभाजी मित्र परिवार, शिवशक्ती मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.नागरिकांना ओळख पत्र देण्यात आले.