खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

अतिउत्साही नागरिकांमुळे मेडिकल सेवा सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरू

अमळनेर तालुका औषधी विक्रेता संघाने नाईलाजाने घेतला निर्णय

अमळनेर (प्रतिनिधी) संचारबंदी लागू असातानाही काही अति उत्साही नगरिक औषधी घेण्याच्या बहाण्याने बाहेर फिरून कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे मेडिकल दुकाने आता ही सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंतच उघडी ठेवण्याचा निर्णय अमळनेर तालुका औषधी विक्रेता संघाने घेतला आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारता लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली आहे. अशा परिस्थितीत मेडिकल ही सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू आहे. परंतु त्याचा फायदा काही अज्ञानी नागरिक घेत आहेत असून औषधी घेण्याच्या बहाण्याने मुद्दामहून गावात फिरताना दिसतात. जेणेकरून शासनाच्या नागरिकांनी घरीच थांबावे. ऊद्देशाची अंमलबजावणी होत नाही. म्हणून आपण अमळनेर तालुका औषधी विक्रेता संघाने नाईलाजास्तव मेडिकल सेवा ही सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे पत्रक जाहीर केले असून अत्यावश्यक औषध हवे असल्यास त्याने मेडिकल असोसिएशनशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button