खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

अवैध वाळू वाहतूक रोखणार्‍या तलाठ्यांवरील जीवघेण्या हल्लाप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी)अवैध वाळू वाहतूक रोखणार्‍या तलाठ्यांवर हल्ला करून मारहाण केल्याप्रकरणी बबलू राजेंद्र तायडे (रा. बेटावद) यांच्यासह ७ जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न , सरकारी कामात अडथळा आणणे  आणि गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        आशिष पारधे यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की कलंबू येथून पांझरा नदीवरून वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळल्यावरून तहसीलदार मिलिंद वाघ यांनी पारधे यांच्यासमवेत धीरज देशमुख , प्रथमेश पिंगळे ,हर्षवर्धन मोरे या तलाठ्यांना अवैध गौण खनिज पकडायला पाठवले होते. त्यावेळी भरवस गावपुढे रेल्वे पुलाच्या अलीकडे निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक होत असल्याचे दिसले.  त्यावेळी ट्रॅक्टर थाम्बवून जमा करण्याचा प्रयत्न केला असता बबलू राजेंद्र तायडे व इतर 8 ते 10 जणानी  पारधे याना पावडीच्या दंडक्याने डोक्यावर , मानेवर , पायावर मारहाण केली. त्यावेळी त्यांनी पिंगळे यांच्या मोटरसायकलची किल्ली काढली. धीरज देशमुख यांनी तायडे याच्या हातातील दांडका हिसकावला. त्यावेळी रुमाल बांधलेल्या एकाने देशमुख यांच्या मानेवर काठीने मारहाण केली. तसेच इतरांनी दगडांनी मारहाण केली. तर ट्रॅक्टर पळवून नेले. यात 10 ग्रामची सोनसाखळी गहाळ झाली, अशा फिर्यादीवरून भादवी  353 ,307 , 379 ,324 ,337 ,323 ,504 , 506 प्रमाणे गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button