अमळनेर (प्रतिनिधी ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरीष चौधरी यांना पक्षाकडून हवे ते सगळे बळ पुरवले जाईल आणि अमळनेर विधानसभा मतदार संघात त्यांचे नेतृत्व आधी पेक्षा जास्त ताकदीने उभे केले जाईल, अशी ग्वाही चौधरी यांना दिली.
अमळनेर विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टी तर्फे शिरीष चौधरी यांचा निसटता पराभव झाला. या पार्श्वभूमीवर त्यांनी आणि त्यांचे बंधू डॉ. रवींद्र चौधरी यांनी समर्थकांसह मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुम्हाला हवे ते सर्व बळ पक्ष देत राहील आणि तुम्हाला पक्षाच्या प्रमुख प्रवाहात आणले जाईल.” ज्यांनी या निवडणुकीत पक्षाशी गद्दारी केली त्या सर्वांना पक्ष जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे.